Sunday, February 26, 2017

राज्य आणि विश्वीयता

विश्वीयता म्हणजे मितीमुक्त असणे . ह्या विश्वीयतेला संपूर्ण शरीर उपलब्ध असणे म्हणजे मोक्ष वा निर्वाण !
निर्वाणासाठी करायची साधना म्हणजे अध्यात्म आणि त्याविषयीची निर्माण करण्यात आलेली वा देण्यात आलेली पद्धत म्हणजे दर्शन होय . ह्या दर्शनाच्या आधारे निर्माण करण्यात आलेले कायदे म्हणजे धम्म होय
धम्म  सातत्याने तर्कशास्त्रीय चिकित्सा करतो किंबहुना तर्कशास्त्रीय चिकित्सा हाच धम्माचा आधार आणि विश्वीयतेचा आधार आहे . इथे पुराव्याशी झटापट आहे आणि श्रध्देला ठाम नकार आहे जिथे माहीत नाही तिथे माहीत नाही हे सांगण्याची नम्रता आहे जर व्यक्त करता येत नसेल तर व्यक्त करता येत नाही ह्याची कबुली आहे आणि त्या अव्यक्ताविषयीं संशय घेण्याची पूर्ण मुभा आहे अधिकार आहे बाबा वाक्यम प्रमाणं  शिवम वाक्यम प्रमाणम  वा बुद्धम वाक्य प्रमाणमला ठाम नकार आहे .

ह्याउलट श्रद्धेच्या आधारे निर्माण करण्यात आलेले कायदे म्हणजे धर्म .इथे तर्कशास्त्र आणि चिकित्सेला नकार आहे संशयाला नकार आहे ह्या धर्मानी समाज संघटित केला आणि ९९. ९९ % धर्म काळाच्या ओघात नाहीशे झाले किंबहुना बलवान धर्मांनी ते नाहीसे करून स्वतःचा संघटित धर्म निर्माण केला ह्या संघटीत धर्मानी एकधर्मभाव निर्माण केला

ह्या संघटीत धर्मांना पहिले आव्हान भगवान शिवांनी दिले आणि जगातला पहिला धम्म स्थापन केला मात्र विविध राज्यातील एकधर्मभावाचे काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यातून सर्वधर्मसमभावाची संकल्पना उदयास आली


शैव धम्मांच्यात तीन प्रकारचे पुरोहित होते
१ गणपती
२ गुरु
३ ब्राह्मण

पुढे गणपतींच्यात राजकीय गणपती आणि धार्मिक गणपती असे दोन प्रकार झाले त्यातील राजकीय गणपतींना गणाधिपती आणि धार्मिक गणपतींना शैवाचार्य वा ऋषी वा मुनी म्हंटले जाऊ लागले
गणाधिपती मात्र राजे म्हणून काम करू लागले त्यांची निवड लोकशाही पद्धतीने होऊ लागली

गुरुंच्यातही १ गुरुव व   २ आचार्य असे दोन प्रकार झाले ह्यातील गुरुव हे पुजारी झाले तर आचार्य शैव दर्शनाचे चिकित्सक !गुरूवांना धर्मगीते  कम्पोज करण्याचा आणि गाण्याचा अधिकार होता तर ब्राह्मणांना गुरुवांना साहाय्य करण्याचा आणि धर्मगीते लिहिण्याचा .


ब्राह्मणांना आपले हे दुय्यम स्थान सहन करणे अवघड झाले विशेषतः अफगाणिस्तानमधून भारतात शिरलेल्या टोळ्यांच्या पुजाऱ्यांना ब्राह्मण म्हणून ह्या व्यवस्थेत सामावून घेतले गेले असले तरी ते त्यांच्या स्थानाविषयी फारसे खुश न्हवते हीच गोष्ट शैव ब्राह्मणांच्या बाबत होती ते समाधानी न्हवते पण व्यवस्था लवचिक असल्याने त्यांना गुरुव बनणे शक्य होते त्यामुळेच अनेक ग्रीक , सेमिटिक आणि शक हुन पुरोहित ह्या व्यवस्थेत सामावून घेतले गेले

ह्या व्यवस्थेला छेद मिळाला तो लिखित क्रांतीने ! ह्या हस्तलिखित क्रांतीने ब्राह्मणांच्या रचनांना संघटित करायला सुरवात केली आणि त्यातून वेदांची निर्मिती झाली . गुरूवांनी ह्या नवीन तंत्रज्ञानाकडे साफ दुर्लक्ष्य केले आणि त्यातून मौखिकतेत अडकलेला मूळ शैव धम्म मागे पडायला लागला आणि हस्तलिखितप्रधान  ब्राह्मणांचा नवा धर्म उदयाला येऊन प्रबळ होऊ लागला त्यातून दोन धर्म तयार झाले असुरधर्म आणि सुरधर्म
असुर प्रबळ असल्याने त्यांनी भारतावर किमान सहाशे वर्षे राज्य केले त्याउलट सुरधर्म मात्र मागे पडला असुरधर्माने स्वतःचा झोरोस्ट्रियन धर्म तयार केला तर सुरांनी स्वतःचा वैदिक धर्म ! हे दोन्हीही अग्निप्रधान धर्म होते कारण दोघेही हिमालयाच्या पायथ्याशी बर्फात जन्मले होते हे दोन्हीही हिमालयीन भारतीयांनी जन्माला घातलेले धर्म होते असुर धर्म तर थेट इराणपर्यंत पसरला आणि असुरांनी भारतीयांच्यावर वारंवार राज्य केले . ह्यातील काही असुरांनी असुरधर्म आणि शैव धम्म ह्यांची सांगड घालायला सुरवात केली आणि त्यातून असुर कपिलाने नव्या शैव धम्माची स्थापना केली हा शैवधम्म म्हणजे विश्वशैव  किंवा ब्रह्मशैव धम्म होय ह्यातूनच उपनिषदे जन्मली
हा कपिलच गौतम बुद्धाचा गुरु होता आणि गौतम बुद्धांनी सुरधर्माला नकार देण्याऱ्या नवीन असुर धम्माची स्थापना केली तो असुर धम्म म्हणजे आत्ताचा हीनयान बौद्धधम्म होय पुढे राजा अशोकाने सर्वच शैवांना बुद्धधम्म स्वीकारायला सांगितले तेव्हा शैवांच्यापुढे वेगळाच पेच निर्माण झाला तो म्हणजे हा मूळ हीनयान आणि आपला शैवधम्म ह्यांची सांगड कशी घालायची त्यातून सकृतदर्शनी बुद्धाची मूर्ती स्वीकारायची पण बाकी सगळी जीवनपद्धती शैवांची ठेवायची अशी सांधेजोड जन्माला आली . त्यातूनच शैवांचा भक्तोपाय आणि हीनयान ह्यांच्या समन्वयातून महायान बौद्ध  तर शैवांचा तंत्रोपाय आणि हीनयान ह्यांच्या समन्वयातून वज्रयान ह्यांचा जन्म झाला . जगभर जो बौद्ध धर्म पसरला आहे तो हा महायान आणि वज्रयान शैव बौद्धधम्म आहे मूळचा गौतम बुद्धांचा निखळ ज्ञानकेंद्रित ज्ञानोपायी हीनयान धम्म आज जवळ जवळ कुठेच नाही आंबेडकरांनी हे ओळखून बुध्दाच्या मूळ हीनयानाकडे वळून त्याला नवीन सामाजिकतेची जोड देऊन नवयानाची स्थापना केली खरी पण शैव प्रवृत्तीच्या भक्तोपायी प्रवृत्तीने आता भगवान शिवांच्याऐवजी भगवान बुद्ध आणि बोधिसत्व भीम ह्यांची पूजा बांधायला सुरवात केली आहे ह्यातून पुन्हा एकदा पूजा अर्चना आणि श्रद्धा ह्या तीन अप्सरांचे पुनरागमन होणे अटळ आहे . नवंयांनी लोकांनी स्वतःला सांभाळले तर ठीक अन्यथा आंबेडकरी  शैव बौद्ध धर्म उदयाला आल्याशिवाय राहणार नाही आणि मग जे शिवाचे आणि गौतम बुध्दाचे झाले तेच ह्या नवयानाचे होईल

श्रीधर तिळवे नाईक




















Friday, February 17, 2017

राजेंद्र बाणाईत : शेवटच्या ओळीवरून एक जाहीर प्रश्न विचारतो
तुम्हाला खूप बुद्धिमान आणि शरीराने अतिशय सुंदर प्रियेसी / पार्टनर मिळाली असती तर इतक्या सुंदर कविता तुम्ही लिहू शकला असता काय ? मुख्य म्हणजे तुमच्यातील कवी आज आहे असाच राहिला असता काय
स्वतःला सतत जागृत ठेऊन तुम्हाला काय मिळाले
तुम्हाला बुद्धिमान प्रियेसीचा नशा हवी होती .....असा माझा तर्क !
चुकले तर माफ करा !    



SHRIDHAR TILVE : 

तुम्ही जाहीरपणे विचारलय  म्हणून जाहीरपणे उत्तर देतोय  माझी प्रेयसी निर्वाण वा मुक्ती ! माझ्या सर्व कवितांच्या मुळांशी तीच आहे बाकी सर्व स्त्रिया ह्या माझ्या सेकंडरी स्पिरिच्युलीझम आहेत वा होत्या . ह्यातीलही मुख्य स्त्री माझी आई नंतर माझ्या दोन बहिणी माझी भाची प्रिया नार्वेकर जिने मला बापपण म्हणजे काय ते शिकवले बाकी प्रेयस्या ह्या माझ्या कधीच मुख्य श्रेयस न्हवत्या अपवाद काहीसा ज्ञचा आणि तिथेही तंत्रमार्गाने शेवटची उडी घेता येईल अशी अटकळ होती जी फसली त्यामुळे सुंदर बुद्धिमान प्रेयसी ह्या मिळणे मिळणे ही गोष्टच गैरलागू आहे कवी स्त्री असो कि पुरुष कधी ओप्पोझिट जेण्डर साठी अडून राहील ह्यावर माझा तरी विश्वास नाही आणि साधक असेल तर बिलकुलच नाही उलट अपोझिट जेंडर अनेकदा अडथळाच बनून साधनात येते अश्यावेळी मुक्ती कि कामवासना असाच प्रश्न निर्माण होतो आणि मी अश्यावेळी कामवासनेचा त्याग केला आहे तेव्हा जरतरला आयुष्यात फारसा अर्थ असत नाही ह्यातून फक्त अस्तित्वात नसलेल्या काल्पनिक प्रश्नांची सरबत्ती सुरु होते 
 आपण  फारच काल्पनिक प्रश्नात अडकून आहोत काय असाच प्रश्न सर्वांनी विचारायला हवा . असे काल्पनिक प्रश्न ही आपल्या मनाची करमणूक असते किंबहुना मन स्वतःला शाबूत ठेवण्यासाठी ज्या युक्त्या करतं त्या युक्त्यांची ही बनवाबनवी असते अनेकदा पलायन असते फेसबुकवर आपण सर्वच अश्या पलायनात भाग घेऊन हे पलायन साजरे करत असतो ह्यातून मुक्ती सोडाच पण स्वातंत्र्याचीही शक्यता नसते फेसबुक हे ९९% सामूहिक पलायन आणि सामूहिक टाईमपास आहे आपण त्याचे किती बळी व्हायचे ही बनवाबनवी असते हे   लिमिट ज्याने त्याने ठरवावे बाय वे ही कविता प्रेयसीला नाही तर मित्राला उद्देशून आहे आपल्या प्रश्नांच्याबद्दल आभारी आहे . 
वस्तुवाद आणि निर्वस्तुवादी कविता श्रीधर तिळवे नाईक
गेले काही दिवस मी चॅनेल निर्वस्तुवादी ह्या संग्रहातील कविता फेसबुकवर टाकत आहे प्रतिसाद अल्प असणे अटळ आहे कारण मुळात मराठीत धड वस्तुवाद हाच प्रस्थापित झालेला नाही मग त्याविरुद्ध बंड म्हणून मी लिहिलेल्या निर्वस्तुवादी कविता पचणे अवघडच मात्र मराठी संस्कृतीत  वस्तुवाद मात्र व्यवस्थित बोकाळला आहे त्यामुळे त्याविषयी आता लिहिणे गरजेचे बनले आहे . ज्या फ्रेंच संस्कृतीत तो प्रथम आला तिथेच मुळात त्याची दखल घेऊन त्याच्यावर विस्ताराने लिहायला २००२ साल उजडले आहे मग मी कोल्हापूर  पासूनच ज्यांना लिहायला सुरवात केली त्या निर्वस्तुवादी कवितांची साधी दाखल तरी कोण घेणार ? ह्या कविता मी सौष्ठवच्या फेब १९९३ च्या अंकात टाकल्या होत्या आणि आता वस्तुवादाच्या प्रभावामुळे त्या दखलपात्र ठरण्याच्या शक्यता आहे . वस्तुवादाला इंग्लिशमध्ये thingism असा शब्द आहे आणि तो फ्रेंच chosisme ह्या शब्दाचे भाषांतर आहे पोस्टमॉडर्न साहित्याच्या संदर्भात chosisme फार महत्वाची संकल्पना मानली जाते
रँडम हाउस ऑफ डिक्शनरी त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे देते

chosisme
[shaw-zeez-muh
Spell Syllables
·         Word Origin
noun
1.
a writing style in which plot and characterization are de-emphasizedand people, events, and setting are recorded as though seen by theauthor through the lens of a camera.
Origin of chosismeExpand
< French, equivalent to chose thing (see chose2) + -isme -ism
Dictionary.com Unabridged
Based on the Random House Dictionary, © Random House, Inc. 2017.









प्रतिसृष्टीय युगात कॅमेरा फार महत्वाचा बनला आणि क्रयवस्तूही ह्या क्रयवस्तूंच्यावर फोकस करणारी नवी 


ऍन्टिनोवेल फ्रेन्च कादंबरीकार Alain Robbe-Grillet ह्याने लिहायला सुरवात केली आणि वस्तुवाद सर्वत्र पसरत गेला हिंदी कवितेत १९८५ नंतर त्याने उच्छाद मांडायला सुरवात केली मराठीत अरुण कोलटकरांची कॅमेरा ही कविता ह्या वस्तुवादाचे उत्तम उदाहरण आहे हिंदीच्या नादाने काही हिन्दीनिष्ठ मराठी कवीही वस्तुवादाचे मूळ आणि कुळ समजून न घेताच वस्तुवादी कविता लिहायला लागले माझा पोस्टमॉडर्नला विरोध असल्याने मी हळूहळू निर्वस्तुवादाकडे वळलो आणि त्यातूनच निर्वस्तुवादी कवितेचा जन्म झाला एका मराठी कवीने संपूर्ण युरोपियन एथॉसला चॅलेंज देणे मराठीतील कूपमंडूक परंपरेला पचणे अवघड होतेच गांडीत नाही किडा आणि भिकारी म्हणतोय मटण वाढा अश्या कलोनिअल  वातावरणात युरोपिअन एथॉसच्या दारात जाऊन युरोपिअन संवेदनशीलतेचे मटण भीक मागून खाणाऱ्यांना निर्वस्तुवाद हा खास भारतीय पद्धतीने तयार केलेला खादयप्रकार पचणे अवघडच देशीवादी समीक्षक तर महाभंपक त्यांनाही ही भारतीय थाळी पचली नाहीच मी अनेकदा म्हंटले आहे माझे साठोत्तरीविरुद्धचे बंड केवळ मराठी साठोत्तरीविरुद्ध नाही ते युरोपिअन ,आणि  हिंदी , कोकणी आणि कन्नड अश्या भारतीय साठोत्तरीविरुद्धही आहे निर्वस्तुवादी कविता हा त्याचा एक भाग आहे .