Thursday, August 10, 2023

 हरी नरके :फुले विचारांचे व्यवस्थापन गेले 

हरी नरके मला समकालीन होते अन आम्ही दोघेही कॉलेजच्या काळात डिबेटिंग कॉम्पिटिशनला प्रथम भेटलो होतो ह्या प्रथम भेटीतच ह्या माणसाशी उभ्या आयुष्यात आपलं कधी पटणार नाही ह्याची मला जाणीव झाली अन माझ्याबाबतही त्यांचं हेच मत झालं असावं 

आमच्या काळात भारतीय समाजरचना ही ओपन , ओबीसी , दलित व आदिवासी अशा प्रवर्गात स्थित झाली होती ह्यांच्याबाबत माझी शैव विरुद्ध आर्य ही मांडणी त्यांना अमान्य होती 

मुळात त्याकाळात साठोत्तरी विचारवंतांच्या ओबीसी प्रवर्गाबाबत दोन मांडण्या आल्या होत्या १ कर्मठ फुले आंबेडकरवादी २ हिंदू वैदिक मी ह्या दोन्ही साठोत्तरी मांडण्याच्या विरोधात होतो अन हे अनेकजणांना त्याकाळात रुचणारे न्हवते त्यात नरकेही होते 

पुढेही शासनाने स्पॉन्सर केलेला विचारवंत अशीच त्यांची इमेज माझ्यावर आदळत राहिली मात्र त्यांनी केलेलं फुल्यांवरचे काम शासनाच्या मदतीशिवाय कसं शक्य होतं ? मला वाटतं त्यांनी जी वैचारिक कामं हातात घेतली होती त्याला शासनाची मदत लागणार हे त्यांना आतूनच पक्के कळलं होतं नाहीतर समग्र महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले बहुजनांना परवडेल इतक्या कमी किंमतीत कोणता खाजगी प्रकाशक देणार होता ?

मुळात महात्मा फुले व आंबेडकर हे दोघेही ब्रिटिश शासनाच्या आधारेच आपला प्रबोधनाचा प्रोजेक्ट चालवत होते नरके ह्यांनी हेच केलं . किंबहुना संपूर्ण ओबीसी प्रवर्ग हा शासनशरण आहे काय असा एक प्रश्नच निर्माण होत असतो . हे दलित प्रवर्गाला लागू होते काय हा प्रश्न आहे आदिवासी प्रवर्ग मात्र ब्रिटिशांच्याविरुद्ध ठामपणे लढत राहिला आहे 

बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तनाचा जो आराखडा दिला त्यात ओबीसी दलित व आदिवासी ह्यांनी एकत्र लढणे अभिप्रेत होते मात्र ह्या प्रवर्गाचे नेतृत्व कुणी करायचे ह्या प्रश्नाचे त्यांचे उत्तर बाबासाहेब आंबेडकर असे होते जे मान्य करायला कुणालाच प्रॉब्लेम न्हवता कारण त्यांच्या नेतृत्वात ती उंची होती प्रॉब्लेम आंबेडकरांच्या मृत्यूनंतर सुरु झाला एकतर आंबेडकरांनी मृत्यूपूर्वी नवयानी बौद्ध धर्म स्वीकारला तो ह्या तिन्ही प्रवर्गांनी स्वीकारायला हवा का असा प्रश्न निर्माण झाला अन ज्यांना नवयान बौद्ध धम्म मान्य नाही त्यांना आंबेडकरवादी म्हणायचे कि नाही असा दुसरा प्रश्न निर्माण झाला ह्यावर तडजोड म्हणून ज्यांनी सत्यशोधक समाज स्वीकारलाय त्यांना आंबेडकरवादी म्हणून स्वीकारायला प्रॉब्लेम न्हवता पण असा स्पष्ट स्टान्स कुणीच घेतला नाही त्यांच्या नकळतपणे ह्या आराखड्यात नेतृत्व आंबेडकरवादी नवयानी लोकांनीच करायचे असा आदेश असल्यागत काहीजण वावरायला लागले जे अनेक ओबीसींना खटकायला लागले अन आंबेड्करांच्यापासून दूर जायला लागले हरी नरकेंनी अशा लोकांना आंबेडकरांचे महत्व पटवण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला पण आंबेडकरवादाची अंतिम परिणीती ही नवयान बौद्ध होण्यातच आहे ही वस्तुस्थिती हळूहळू स्थिर व्हायला लागली अन मला मी नवयानी आंबेडकरवादी नाही असं ठामपणे सांगावं लागलं 

नरके ह्यांनी ओबीसी प्रवर्गाची दिशा आंबेडकरी ठरवल्याने साहजिकच त्यांना आंबेडकरी विचारपीठांनी आपल्या  जागा पुरवल्या मात्र भाजपने जो माधव फॉर्म्युला आणला त्यात दलित प्रवर्ग न्हवता ह्या फॉर्म्युलाने दलित प्रवर्ग हा ओबीसी प्रवर्ग व आदिवासी प्रवर्ग ह्यांच्यापासून वेगळा पाडला मोदींचे ओबीसी नेतृत्व प्रस्थापित झाले अन दलित प्रवर्गापुढे मोदींचे ओबीसी नेतृत्व स्वीकारायचे कि नाही असा प्रश्न निर्माण झाला नरके ह्यांनी जीव खाऊन मोदींचा प्रतिकार केला पण परिणाम उलटा झाला ओबीसी समाज त्यांच्यापासून दुरावला व ते एकाकी पडत गेले 

ओबीसी प्रवर्गाबाबतची दुसरी मांडणी ही प्राचीन काळापासून आगम विरुद्ध निगम अशी आहे साठोत्तरी पिढीत ती वैदिक विरुद्ध हिंदू अशी झाली त्यात ब्राम्हण क्षत्रिय वैश्य हे वैदिक धर्मी आहेत तर उरलेले ओबीसी दलित आदिवासी हिंदू होते आहेत ह्या मांडणीत वैष्णव किंवा विष्णू मान्य नसणाऱ्या लोकांच्यासाठी रामकृष्ण धर्म व शैव धर्म मिळून हिंदू धर्म होतो पार्थ पोळके ह्यांनी हिंदू विरुद्ध वैदिक ह्या पुस्तकात ही मांडणी केली आहे अलीकडे संजय सोनवणी हे ती विस्ताराने मांडत आहेत नरकेंचे ह्या मांडणीविषयीचे मत काय हे मला अजूनही कळलेलं नाही  मात्र ह्या दुसऱ्या मांडणीविषयी त्यांना सॉफ्ट कॉर्नर होता 

ह्या तिन्ही मांडण्यात एक फॅक्टर कॉमन होता व आहे तो म्हणजे  फुले आणि आंबेडकर माझ्या आणि दुसऱ्या तिसऱ्या मांडणीत  शिव कॉमन आहे मी माझ्या मांडणीतून  राम कृष्ण वगळलेले आहेत कारण ते वर्णजातिसमर्थक आहेत आणि हे आंबेडकरांनी स्पष्टपणे सिद्ध करून दाखवले आहे 

हरी नरकेंच्या विचारातला सर्वाधिक चमत्कारिक भाग म्हणजे त्यांनी नेमाड्यांच्या देशीवादाला मतभेदासहित दिलेला पाठींबा ! अनेक ओबीसी लेखक देशीवादाच्या व नेमाडेंच्या भजनी लागले त्यात एक नरकेही होते , एका अर्थाने ते साठोत्तरीचेच एक्स्टेंडेड विचारवंत होते हे त्यांना प्रस्थापितांविषयी असलेल्या आकर्षणातून आले होते का ?

ब्राह्मण्यवादाला त्यांचा जहाल विरोध होता पण ब्राह्मणांना शत्रू मानावे कि नाही ह्याबाबत ते सुरवातीला संभ्रमात होते व उतारवयात जेव्हा त्यांना आपल्याच वर्गाचे कडवट अनुभव आले तसे ते पुरोगामी ब्राम्हणांचा अधिकाधिक आदर करायला शिकले मात्र जेव्हा सनातनी कर्मठ ब्राह्मण्यवाद आढळला तेव्हा ते तुटून पडले अपवाद छगन भुजबळ भुजबळांच्यावरचे त्यांचे प्रेम शेवटी त्यांना गोत्यात आणणारे ठरले भुजबळांच्यासारखा हिंदुत्ववादी चालतो तर मोदींच्यासारखा हिंदुत्ववादी का चालत नाही ह्या ओबीसींच्या प्रश्नाला ते बगल देत राहिले ओबीसी चळवळीनं महात्मा फुल्यांच्यात अडकून पडू नये पुढचं पहावं अशी माझी मांडणी आहे त्यांना हे विचारात मान्य नसावं ते फुल्यांचे अंधभक्त म्हणावेत इतके कट्टर प्रवर्तक होते मंडल आयोगाला प्रथम विरोध करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनी काळाची बदललेली पावलं ओळखून पाठींबा दिला तेव्हा काय करायचं असा एक पेचप्रसंग निर्माण झाला नवयानी समाज हा सध्या एका बेटावर राहतोय निदान ओबीसींनी तरी असं बेट निर्माण होऊ देऊ नये असं माझं मत आहे सध्या ओबीसी समाज हिंदुत्ववादी अन विचारवंत सेक्युलर अशी दुफळी पडलीये मोदींच्या हर हर महादेव मागे हा समाज दोन्ही निवडणुकीत गेला अन तो तसा चाललाय ह्याची स्पष्ट जाणीव मला असल्यानेच दोन्हीवेळा मी मोदीच जिंकणार असं प्रेडिक्शन दिलं होतं ते ओबीसी विचारवंतांना आवडलं न्हवतं कारण हे विचारवंत ढगात होते ह्याचा एक दुष्परिणाम असा झाला कि माझ्यावर मी हिंदुत्ववादी असल्याचा स्टॅम्प ह्यांच्यापैकी काहींनी मारला नरके ह्यांनी त्याला मूक संमती दिली मी अर्थातच असल्या गोष्टी नजरेआड करतो 

हरी नरकेंचे खरे योगदान हे त्यांनी फुले आंबेडकर विचारांचे जे व्यवस्थापन  केले व त्याचा प्रचार व्हावा म्हणून जी जीतोड मेहनत घेतली त्यात आहे  त्यांनी फुल्यांच्याबाबत त्यांची तारीख असो किंवा फोटो असो ह्याबाबत काही मूलभूत संशोधन केलं मी त्यांच्या प्रेमात पडलो तो क्षण जेव्हा त्यांनी बाळ गांगल ह्यांच्या फुल्याविषयीच्या  सडकी मांडणीचा प्रभावी प्रतिवाद केला हा होता हा प्रतिवाद त्या काळात फुलेवादी चळवळीसाठी आवश्यक होता 

त्यांचे दुसरे योगदान त्यांनी राखीव जागांचा लढवलेला लढा ! मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी ते कायमच निकराने भांडले व पुढेही जेव्हा जेव्हा ह्यावर टाच येण्याची शक्यता आली ते लढले पुढे मराठा आरक्षण प्रश्नाने त्यांची परीक्षा पाहिली . ते कट्टर आरक्षणवादी होते २००० ते २००६  साली वैश्य वाणी समाजाला आरक्षण मिळावे म्हणून त्यांनी यशस्वी प्रयत्न केले पण २०११ साली ते मागे घेण्यात आले आणि मोठा वैश्य समाज हिंदुत्ववादाकडे गेला विशेषतः कोकणात नारायण राणेंची ताकद त्याने वाढवली होती आणि काँग्रेसमध्ये राणे गेल्यावर घालवली त्यात हा आरक्षण इश्यू महत्वाचा होता पुढे मराठ्यांच्याबाबत असाच गुंतागुंतीचा प्रकार होत गेला आणि मराठा आणि वैश्य ह्या दोन्ही समाजात त्यांची लोकप्रियता ओहोटीला लागली मात्र दलित समाजात मात्र ती कमी झाली नाही 

मराठीला आर्ष भाषेचा दर्जा मिळावा म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न हेही महत्वाचे आहेत ते मराठीसाठी कमालीच्या चिकाटीने लढले 

आमच्या पिढीतल्या परंपरावादी साठोत्तरी लोकांना नेहमीच मान्यता मिळाली ज्यांनी देशीवाद स्वीकारला नवतावादी लोक मात्र वाळीत टाकले गेले नरके प्रबोधनाच्या परंपरेला प्रमाण मानणारे साठोत्तरी देशीवादी विचारवंत असल्याने त्यांनाही मान्यता मिळाली पण अचानक ते हिंदुत्ववादी सत्तेवर आल्यावर साईडलाईन व्हायला लागले 

वैयक्तिक पातळीवर मी माझ्या बाजूने दोनदा प्रयत्न केले पण त्यांचे दरवाजे माझ्यासाठी कधीच उघडले नाही माझी संकरित पार्श्वभूमी माझी भगवी वस्त्रे मी एकेकाळी अभिधाचा संपादक होतो म्हणून अभिधानानंतर ग्रुप मीच स्थापन केला हा त्यांचा गैरसमज ह्या ग्रुपमधील संजीव खांडेकरशी असलेले त्यांचे भांडण अन मी संजीवचा खास मित्र आहे अशी त्यांना पटलेली चुकीची खात्री ह्यामुळे त्यांच्यासाठी मी कायमच शत्रू राष्ट्रात होतो मी मात्र त्यांना कधीही विरोधी पक्षात ठेवले नाही आमच्या पिढीत फुले आंबेडकरांची सशक्त मांडणी त्यांच्याइतकी कोणीच केली नसेल अनेकदा आपण पुढे सरकत नसतो कारण लढाई जिवंत ठेवणे हेच आवश्यक बनते त्यांनी फुले आंबेडकर वादाची लढाई जिवंत ठेवली 

त्यांच्या मृत्यूवर संजय सोनवणी व छगन भुजबळ ह्यांची परस्परविरोधी स्टेटमेंट्स आलेत त्यांचा मृत्यू वादग्रस्त व्हावा हे दुर्देव !

त्यांच्या मृत्यूने एक खंदा फुले आंबेडकरवादी योद्धा विचारवंत निघून गेला हे नक्की ! माझी त्यांना आदरांजली !

श्रीधर तिळवे नाईक 




Tuesday, July 18, 2023

 तंत्र  धर्म धम्म आणि मराठी कविता श्रीधर तिळवे नाईक 

तंत्र म्हणजे मोक्ष मिळवण्याची जीवनशैली जी कामातून जन्मते अर्थातून वाढत जाते आणि स्थावर व जंगम ह्यांचा समतोल साधत मोक्षात शिवात लय पावते ह्या तंत्रातूनच पुढे शैव धम्म तंत्रशृती निर्माण झाल्या व पुढे आदीशैव धम्म  धर्म वा मूळ शैव धम्म , लोकशैवधम्म , नवशैवधम्म निर्माण झाले 

मजहब किंवा रिलिजन  म्हणजे श्रद्धेच्या आधारे निर्माण केलेली कायदेसंहिता व तिच्या आधारे निर्माण केलेली स्थिर  जीवनशैली ह्यात प्रामुख्याने झोरोष्ट्रियन , ज्यू , ख्रिश्चन व इस्लाम हे रिलिजन येतात 

धर्म म्हणजे श्रद्धेच्या आधारे निर्माण केलेली कायदेसंहिता व तिच्या आधारे निर्माण केलेली केऑस व डिसऑर्डर निर्माण करणारी केऑटिक डीसऑर्डरड जीवनशैली जी वर्णजात निर्माण करते स्वीकारते मात्र मोक्षाला प्रोत्साहन देते जागा देते समाजाला केऑसमध्ये फेकून आर्यांना म्हणजे वर्णजात व्यवस्था प्रमाण मानणाऱ्या क्षत्रिय ब्राम्हणांना उच्च स्थानी ठेवते ह्यात प्रामुख्याने ब्राह्मणधर्म , वैष्णवधर्म व हिंदुधर्म हे तीन धर्म येतात 

धम्म म्हणजे धर्मवर्णजातींना नाकारून तंत्र वा दर्शन आणि त्याआधारे निर्माण केलेली जीवनशैली ! ह्यात प्रामुख्याने सांख्य , जैन , बौद्ध हे धम्म येतात 

मराठीचे दोन्ही आद्य ग्रंथ गाथासप्तशती व गुणाढ्याचे बृहत्कथा हे शैव तंत्रातून धम्मातून जन्मले आहेत आणि त्यांचाच प्रभाव साहित्यिक महाराष्ट्रावर होता मात्र आद्यशंकराचार्यांच्यानंतर चित्र बदलले इसवीसन  १००० नंतर विवेकसिंधु हा वेदांतधर्मी ग्रंथ जन्मला यादवकाळात द्विवर्णीय श्रुतिस्मृतिपुराणोक्त हिंदू धर्म जन्मला ज्ञानेश्वरी व नामदेवाची गाथा यांनी वैष्णव धर्म वारकरी संप्रदाय म्हणून उभा केला तर ज्ञाननाथांनी अनुभवामृत लिहून शैव धर्म जिवंत ठेवला मराठीत चक्रधरांनी नववैष्णव धम्म उभा केला दक्षिण महाराष्ट्रात बसवेश्वरांचा नवशैव धम्म लिंगायत पोहचला मात्र मराठी संस्कृतीत मोक्ष मिळवणारे चार प्रभावी साहित्यिक चक्रधर , नामदेव , एकनाथ व तुकाराम हे वैष्णवधर्मी असल्याने महाजन मराठी संस्कृती ही वैष्णव धर्मी झाली आणि शैवांना शूद्र ठरवणारी वैष्णव जीवनशैली खुद्द शैवांनी स्वीकारली हे म्हणजे गुलामांनी स्वतःहून तुरुंग स्वीकारणे होते काहीकाळ शिवाजी व संभाजी राजांनी व शिवशाहीने त्याला शह दिला पण हा शंभर वर्षांचा इतिहास मस्तानीचे निमित्त करून बाजीरावाला गिळून आर्य ब्राह्मणशाहीने गिळला उत्तरपेशवाईत नानासाहेब पेशव्यांच्या काळात हा श्रुतिस्मृतिपुराणोक्त वैष्णव धर्म महाराष्ट्रात बहरला त्याने जन्मजडित वर्णजातिव्यवस्था स्वीकारली अस्पृश्यता स्वीकारली मनुस्मृतीतले अनेक कायदे स्वीकारले ब्राम्हण व शूद्र हे दोन वर्ण स्वीकारले साहजिकच रामायण व महाभारत मराठी साहित्य संस्कृतीच्याही केंद्रस्थानी आले रामायण महाभारताच्या अनेक भागांचे अनुवाद किंवा अनुसर्जन झाले अनेक शैवांनी ह्याच काळात गीता स्वीकारली तिचे अनेक मराठी अवतार अवतारायला लागले पण सर्वाधिक प्रतिसाद ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिकेला मिळाला 

पेशवाईच्या पाडावानंतर महाराष्ट्रात प्रथमच सत्यशोधक समाज हा नवशैव समाज आला पण त्यात मोक्ष न स्वीकारल्याने बहुतांशी शैवांनी तो नाकारला अनेकांनी तो ख्रिश्चन धर्माची शाखा असल्याची टीका केली ह्याचा पुरेपूर फायदा वैष्णव धर्माला मिळाला आता वैष्णव धर्म गीता धर्म म्हणून आला गीता वर्णव्यवस्था स्वीकारत असल्याने गीता मानणाऱ्या अनेकांनी वर्णव्यवस्था स्वीकारली टिळक हे ह्यांचे अर्ध्वयू होते अगदी महात्मा गांधीही गीताधर्मी होते तोवर वर्णजात मानत होते पुढे ते चक्रधरांच्या वर्णजात न मानणाऱ्या नववैष्णव धम्मात दाखल झाले 

रानडे ह्यांनी वेदांत आणि वारकरी धर्म स्वीकारल्याने त्याचाही प्रभाव पडला पुढे गोक्षले व गांधी ह्यांनीही गीता व वेदांत स्वीकारला 

साहजिकच मराठीत केशवसुत , सावरकर वैग्रे सर्व वेदांती होते अगदी मर्ढेकर विंदा करंदीकर हेही वेदांती होते करंदीकर तर मार्क्सवादी असूनही वेदांती होते 

बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला पण त्याचे साहित्यीक परिणाम साठोत्तरीत निपजले यशवंत महानोर म्हणतात तसे 

मला आनंद देत नाही कुठलीही कला 

सृष्टीच्या नाना लीला 

छळतात सारी  शास्त्रे पुराणे वेदांत 

गळा आवळणारे नाना धर्मपंथ 

असं म्हणत हे साहित्य अवतरले 

नामदेव ढसाळांची व्यवस्थेच्या डोक्यात दगड घालायला निघालेली ही कविता पहा 

वडारी दगडांना स्वप्न देतात ..

मी फुलबाजा पेटवतो …

बापाच्या आयुष्यात उतरू नये म्हणतात …

उतरतो … कानाकोपरा खाजवतो …

वडारी दगडांना फुलं देतात …

मी बेंडबाजा वाजवतो …

चार स्त्रियांच्या कमानी देहातून ….

कातळलेला उभा पारशी ओलांडतो …

बापाचा रक्ताळलेला पुठ्ठा पाहतो ….

अंधाराच्या गोन्दणीत ओठ भाजेपर्यंत सिगार ओढतो , उसमडतो …

वडारी दगडांना गरोदर ठेवतात …

मी थकलेले घोडे मोजतो …

स्वतःला टांग्याला जुंपून बापाचे प्रेत हाताळतो , जळतो ….

वडारी दगडांना रक्तात मिसळतात

मी दगड वाहतो …

वडारी दगडाचं घर करतात …

मी दगड डोक्यात घालतो …. मी दगड डोक्यात घालतो …

किंवा 

हा भाकरीचा जाहीरनामा 

हा संसदेचा रंडीखाना 

ही देश नावाची आई 

राजरोस निजते कुबेराच्या सोबत 

असं ढसाळ ठणकावतात आणि 

तेच तेवढे आईच्या उदरातून आलेत? 

बाकीचे कुत्र्या-मांजराच्या! 

असा प्रश्नही विचारतात 

साठोत्तरी पिढीने पुन्हा एकदा वारकरी वैष्णव धर्म  व बौद्ध धम्म केंद्रस्थानी आणले आणि आजही ह्या दोन्हींचा प्रचंड प्रभाव मराठी साहित्यिकांच्यावर प्रचंड आहे एका अर्थाने जो पुरोगामी प्रोजेक्ट १९ व्या शतकात पूर्ण व्हायला पाहिजे होता तो पूर्ण करण्याचा प्रयत्न देशीवाद करतो तो अनेक वास्तवे सादर करतो जे वास्तववादाने करायचे काम होते पण जे ब्राह्मणी प्रभावामुळे व वर्णजातीमुळे अपूर्ण राहिले वेदांती प्रभावाने जी आत्मग्लानी मराठी लेखकांना प्राप्त झाली होती ती ग्लानी देशीवादाने अनेक जाती जमातींची वास्तवे कादंबरी व आत्मचरित्राद्वारा सादर करून उडवली व ब्राह्मणीपणाला ताळ्यावर आणले तुम्ही पाहता ते जग ३ टक्क्यांचे आहे त्याचा उर्वरित भारतीय समाजाशी संबंध नाही असे ठणकावले पुरोगामी वादाच्या काळात वारकरी व गीताधर्म केंद्रस्थानी आल्यावर साहजिकच हेच केंद्रस्थानी राहिले 

चित्रे व अरुण कोलटकर ह्यांनी शैव धम्माला काही प्रमाणात व्यक्त केले तरी त्यात प्राण न्हवता अरुण कोलटकरांनी जेजुरीमध्ये जे काही लिहिलंय त्याला शैव म्हणावं कि नाही ह्याबद्दल मला शंका आहे ह्या कविता आउटसायडरच्या कविता जास्त वाटतात तर चित्र्यांच्या शैव कविता म्हणजे ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाची  लैंगिक तांत्रिक बजबजपुरी आहे ज्यात ना साधक आहे ना साधना ! केवळ देशीवादी धुळवड उडवायची म्हणून उठवलेली उठवळ असे त्याचे अनेकदा स्वरूप होते त्याउलट ते वारकरी वैष्णव धर्मात घुसतात तेव्हा जोमदार होतात हेच अरुण कोलटकरांचेही होते मात्र धार्मिक परंपरेचे ते जेव्हा उत्तराधुनिकीकरण करतात तेव्हा मजा येते उदा त्यांची ही कविता पहा 


वामांगी


देवळात गेलो होतो मधे

तिथ विठ्ठल काही दिसेना

रखमाय शेजारी

नुसती वीट


मी म्हणालो ऱ्हायल

रखमाय तर रख्माय

कुणाच्या तरी पायावर

डोक ठेवायच


पायावर ठेवलेल डोक

काढून घेतल

आपल्यालाच पुढ माग

लागेल म्हणून


आणि जाता जाता सहज

रख्मायला म्हणालो

विठू कुठ गेला

दिसत नाही


रख्माय म्हणाली

कुठ गेला म्हणजे

उभा नाही का माझ्या

उजव्या अंगाला


मी परत पाह्यल

खात्री करुन घ्यायला

आणि म्हणालो तिथ

कोणीही नाही


म्हणते नाकासमोर

बघण्यात जन्म गेला

बाजूच मला जरा

कमीच दिसत


दगडासारखी झाली

मान अगदी धरली बघ

इकडची तिकड जरा

होत नाही


कधी येतो कधी जातो

कुठ जातो काय करतो

मला काही काही

माहिती नाही


खांद्याला खांदा भिडवून

नेहमी बाजूला असेल विठू

म्हणून मी पण बावळट

उभी राहिले


आषाढी कार्तिकीला

इतके लोक येतात नेहमी

मला कधीच कस कुणी

सांगितल नाही


आज एकदमच मला

भेटायला धावून आल

अठ्ठावीस युगांच

एकटेपण


कवितासंग्रह - चिरीमिरी

प्रकाशन  : प्रास प्रकाशन

इथं एका बाजूला वारकरी धर्म आहे तर दुसऱ्या बाजूला धार्मिक परंपरेला तिरकसपणे गंमतीशीरपणे पाहण्याचा हसताखेळता उत्तराधुनिक दृष्टिकोन आहे जेजुरीमध्ये जे साधलं न्हवतं ते इथं साधलं आहे कथ्थ्य कविता असूनही लिरिकल बाज कायम आहे मात्र यमकबंदिश सर्वत्र पाळलेली नाहीये 

साहजिकच आमच्या नव्वदोत्तरी पिढीवर वारकरी वैष्णव आणि बौद्ध कोलीजन करून जोरदारपणे आदळले . अरुण काळे महेंद्र भवरे प्रज्ञा लोखंडे ह्यासारख्या अनेकांनी साठोत्तरी नवबौद्ध संवेदनशीलता नामदेव ढसाळप्रमाणे अभिमानाने मिरवली  

ह्या पार्श्वभूमीवर माझी वैयक्तिक चांगलीच गोची झाली घरात रवळनाथाचे मंदिर असल्याने शैव संवेदनशीलता घरगुती होती ती सहज माझ्या आयुष्यात आली सुरवातीला माझे लेखन लोकायती होते कारण डाव्यांचा प्रभाव पण शक्तीपाताने सगळेच बदलल्याने शैव संवेदनशीलता सहज उमटायला लागली पुढे जे कृष्णमूर्ती , ओशो ,आंबेडकरांच्या प्रभावाने बौद्ध आले नवबौद्ध हे त्या काळात एकमेव असे होते जे वारकरी परंपरेविरुद्ध ठाम उभे ठाकले वारकरी संतांनी वर्णजातीबाबत काहीच केले नाही उलट त्यांनी वर्णजात मजबूत केली असे दलित साहित्याने ठणकावून सांगितले महाराष्ट्रातील बौद्ध परंपरा त्यांनी शोधायला सुरवात केली आंबेडकरवादी पुरोगामीवाद फार काळ टिकला नाही आमच्या पिढीत १९९० नंतर तर काही दलित लोकांनी  वारकरी संप्रदायाशी आणि विठ्ठलाशी जुळवून घ्यायला सुरवात केली संत चोखा महार व संत सोयराबाई ह्यांचे अभंग QUOTE करण्यात येऊ लागले उदा संत चोख्याचा हा अभंग 

आम्हां अधिकार उच्छिष्ट सेवन । संतांचे पूजन हेंचि बरें ॥१॥

सुलभ सोपारें विठोबाचें नाम । आणिक नाहीं वर्म दुजें काहीं ॥२॥

आवडीनें नाम गाईन उल्हासें । संतांच्या सहवासें खेळीं मेळीं ॥३॥

चोखा म्हणे माझी आवडी ही देवा । पुरवावी केशवा जन्मोजन्मी ॥४॥


चोखांचा एक अभंग रामावरही आहे 

अवघा आनंद राम परमानंद । हाचि लागो छंद माझे जीवा ॥१॥

हेंचि साधन निकें जगासी उद्धार । आणिक साचार दुजें नाहीं ॥२॥

क्रोधांचे न पडतां आघात । वाचे गातां गीत राम नाम ॥३॥

चोखा म्हणे ऐसा भरंवसा नामाचा । जेथें कळिकाळांचा रीघ नाहीं ॥४॥

किंवा सोयराबाईंचा हा अभंग 

अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥१॥

मी तूंपण गेलें वायां । पाहतं पंडरीच्या राया ॥२॥

नाही भेदाचें तें काम । पळोनी गेले क्रोध काम ॥३॥

देही असुनी तूं विदेही । सदा समाधिस्थ पाही ॥४॥

पाहते पाहणें गेले दुरी । म्हणे चोख्याची महारी ॥५॥

किंवा खालच्या अभंगातील 

पंढरीचे ब्राम्हणे चोख्यासी छळीले । तयालागीं केले नवल देवें ॥१॥

सकळ समुदाव चोखियाचे घरी । रिध्दी सिध्दि द्वारी तिष्ठताती ॥२॥

रंग माळा सडे गुढीया तोरणे । आनंद किर्तन वैष्ण्ववांचे ॥३॥

असंख्य ब्राम्हण बैसल्या पंगती । विमानी पाहती सुरवर ॥४॥

तो सुख सोहळा दिवाळी दसरा । वोवाळी सोयरा चोखीयासी ॥५॥

ही भूमिका पुन्हा दाखल व्हायला लागली 

ह्या बदलाचे काय करायचे हा माझ्यापुढचा प्रश्न होता जात म्हणजे सर्व दिशांना आढळणारा मॉन्स्टर आहे असं म्हणणाऱ्या व त्यासाठी धर्मांतर करणाऱ्या बाबासाहेबांच्या भूमिकेशी हे विपरीत होते नवबौद्ध क्रांती मागे पडून तडजोडवादी व्यूह उदयाला येतोय हे माझ्या लक्ष्यात यायला लागले पुढे वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी विठ्ठल मंदिरात पूजा करून हा व्यूह लोकमान्य केला 

मी बौद्ध धारा केवळ नवबौद्धमध्ये अडकून ठेवू इच्छित न्हवतो  माझ्या मते आदिबौद्ध परंपरेनंतर आंबेडकरांनी नवयान समाज स्थापन करून बौद्ध धम्माचे पुरोगामीकरण केले जे कृष्णमूर्तींनी आधुनिक बौद्धधम्म मांडला तर ओशोंनी उत्तराधुनिक श्रमण धम्म  मांडले ज्यात बौद्ध धम्मही येतो ह्या नव्याशी जुळवून घेत आपण चौथ्या नवतेचा बौद्ध धम्म मांडू शकतो का हा माझ्यादृष्टीने पुढचा प्रश्न होता आंबेडकरी साहित्यिकांनी जे कृष्णमूर्ती स्वीकारलेच नाहीत मात्र ओशो हे जैन असल्याने त्यांना स्वीकारार्ह वाटले कारण ओशो परंपरेविरुद्ध बंड करत न्हवते तर बौद्ध परंपरा नव्याने मांडत होते माझा ओशोंच्याबद्दल प्रॉब्लेम असा होता कि ओशो शैवांशी फारसे सलग्न न्हवते ते शंकराला स्थान देण्याऐवजी गोरखनाथांना पहिल्या पाचात ठेवत होते तंत्रसुत्राविषयीचे त्यांचे प्रेम एका अपरिहार्यतेतून आले होते प्रत्यक्षात ते आर्यनच होते मात्र दलित साहित्य जर ओशोंना सामावून घेणार असेल तर माझ्याकडून त्यांचे स्वागत होते कारण बाबासाहेबांच्या पलीकडे जाण्यासाठी ते उपयोगी होते 

वैयक्तिक पातळीवर बौद्ध साधनेने मला हवी असलेली निर्विकल्प जम्प  मिळेना तेव्हा मात्र मी तंत्राकडे वळलो बायका पुन्हा माझ्या आयुष्यात आल्या पण त्यानेही काही झाले नाही हळूहळू बौद्ध धम्म सुटायला लागला पारंपरिक शैव धम्म अपुरा वाटायला लागला 

सुरवातीच्या काळात कोल्हापुरात अंबाबाई व ज्योतिबा जनमानसात इतके रुजलेत कि शैव असणे हा गुन्हा आहे असं मला कधीही वाटलं नाही साहजिकच मी डेकॅथलॉन अनकॅटेगरीत मी शैव कवी होतो मला हा गुन्हा असल्याची जाणीव देशीवाद्यांनी दिली मग मी विठ्ठलावर कविता लिहिल्या पण पंढरपुरात जे मी पाहिले त्याचेच प्रतिबिंब त्यात पडले पुढे बुद्धावरही कविता आल्या वारकरी व महानुभाव ह्यांचा ह्या काळात इतका दरारा देशीवाद्यांनी निर्माण केला होता कि कदाचित त्यामुळेही हे घडले असावे पण मी त्यात अडकलो नाही पुढे सरकलो 

आज अवस्था अशी आहे कि सत्यकथेने १९५५ ते १९७० ह्या काळात जी मराठी साहित्यावर मक्तेदारी निर्माण केली होती तिला मोडून काढून देशीवाद्यांनी त्यापेक्षा भयानक अशी दादागिरी १९८५ ते २०२३ ह्या काळात निर्माण केली आहे ब्राम्हण गेले आणि पाटील आले अशी म्हणावी अशी आजची स्थिती आहे आमची नव्वदोत्तर पिढी तर फुल कापून टाकण्याचा आदेश मिळालाय कि काय असं वाटावं अशी आज स्थिती आहे 

ह्याचे उत्तम उदाहरण शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग आहे ही वारकरी दादागिरी अशी आहे कि शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग आपले विद्यापीठ अंबाबाई व ज्योतिबाच्या प्रदेशात वसले आहे ही गोष्ट विसरले .  पुढे जाऊन तर ह्या विद्यापीठाने अंबाबाईला महालक्ष्मी बनवण्याच्या प्रयत्नात बौद्धिक साथ दिली वास्तविक कोल्हापूरची शैव लीगसी शोधण्याची पुढे चालवण्याची जबाबदारी ह्या मराठी विभागावर होती पण त्यांनी देशीवादाच्या प्रभावाखाली येऊन ती धुडकावली स्वतःला देशीवादी म्हणवणाऱ्या ह्या लोकांना कोल्हापूरची स्थानिक परंपरा नीट कळू नये ह्या विटंबनेला काय म्हणावे ?

वास्तविक महाराष्ट्राचा मुख्य देव शिव शंकर आहे आणि पांडुरंगही शंकर आहे पण ब्राह्मणधर्मीयांनी व वैष्णवांनी वर्णजातिव्यवस्था आणण्यासाठी विठ्ठलाचे वैष्णवीकरण घडवले वारकरी निर्माण केला आणि आज महाराष्ट्रात त्याचाच प्रभाव आहे पुढेही १९व्या शतकात महाराष्ट्रात जो गीताधर्म निर्माण झाला त्याचाच प्रभाव होता ज्ञानेश्वरचीचा गाजावाजा ह्याच काळापासून सुरु झाला ज्या ब्राम्हणांनी ज्ञाननाथांना वाळीत टाकलं होतं त्यांचाच जयजयकार सुरु झाला ह्याच काळात ख्रिश्चन मिशनऱ्यांनी तुकारामाचा गाजावाजा सुरु केला तेव्हा तुकाराम महान असल्याचा साक्षात्कार मराठी समीक्षेला झाला हा वारकरी प्रभाव इतका वाढला कि राजकारणातसुद्धा शरद पवार व बाळासाहेब ठाकरे हे आमचे विठ्ठल आहेत आमचा प्रॉब्लेम बडव्यांशी आहे असं म्हणण्याची रीत रूढ झाली आहे 

हळूहळू ह्या वारकरी प्रभावामुळे नेमाडेंची जात स्वीकारावी मात्र तिची आडवी मांडणी स्वीकारावी उभी नाकारावी ही मांडणी स्वीकारार्ह होत चालली आहे ह्यामुळे जातीवाद वाढणे अटळ आणि तसा तो वाढला आहे वाढत जाणार आहे ह्यातून निर्माण होणाऱ्या भीषणतेची कल्पना आजही अनेकांना येत नाही ही आडवी व्यवस्था उभी करणारा गेम आज ना उद्या अवतरणे अटळ आहे तसे झाले तर काय होईल ह्याची कल्पनाही करवत नाही ब्राह्मणधर्म हा नेहमीच संधीची वाट पाहत असतो नेमाडे व देशीवादाने त्यांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे 

 ब्राह्मणधर्म हा नेहमीच प्रथम वैश्यांना आपल्या बाजूने वळवतो मग क्षत्रियांना ! मोदी व अमित शहा वैश्य असूनही ब्राम्हण धर्मियांनी त्याविरुद्ध आवाज उठवला नाही कारण मुळातच वैश्य किंवा क्षत्रिय लोकांना राज्यावर बसवावे आणि आपण पाठीमागून राज्य करावे ही ब्राह्मणधर्मीयांची मानसिकता आहे 

नरेंद्र मोदी हे भारतातले पहिले पंतप्रधान आहेत जे हर हर महादेव म्हणत सत्तेवर आले आहेत साहजिकच शैव  ओबीसींबीसीआदिवासींचा प्रचंड पाठींबा त्यांच्या मागे आहे ब्राह्मणधर्मीयांना हा पाठींबा निवडून येण्यासाठी आवश्यक वाटतो पुरोगामी लोकांना हर हर महादेव म्हणायला लाज वाटते आणि ही आढ्यता त्यांच्या विरोधात गेली आहे एका विदुषीने तर आम्हाला शिवाजी महाराज हवेत पण त्यांचा शैव धर्म नको असे उघड उद्गार काढले होते हा दुतोंडीपणा काही आजचा नाही तो टिळकांच्यापासून चालत आलेला आहे नंतर ह्या विदुषी वारकऱ्यांसाठी पोळ्या लाटायला गेल्या होत्या 

ह्याचा एक विचित्र परिणामही झाला आहे पुरोगामी नवबौद्ध अचानक शैवांना शत्रू समजायला लागलेत ह्या नवबौद्धांच्या मागे समाज नाही ह्यांचा फक्त गाजावाजा आहे प्रत्यक्षात मत देतांना हा समाज रामदास आठवलेंच्या मागे जातो असे निरीक्षण आहे 

प्रश्न इतकाच आहे कि मोदींचा हा नवा हिंदुत्ववाद हा ब्राह्मणधर्माच्या कवेत जाणार कि समतावाद स्वीकारून जातिवर्णव्यवस्था नष्ट करणार आहे ?

प्रश्न असा आहे कि प्रभावी ठरत चाललेल्या बहुजनांच्या शैव परंपरेला तुम्ही सांस्कृतिक जागा देणार आहात कि नाही ?

अजून तरी मराठी साहित्यिक ह्याबाबत झोपलेले आहेत ते पुरोगामीवादात डुलक्या घेतायत काळ नेहमीप्रमाणे पुढे गेला आहे 

मोदींचा पराभव पुरोगामीवाद्यांच्याकडून होणार नाहीये तो होणार आहे त्यांच्या वाढत चाललेल्या ब्राह्मण्यवादी धोरणांच्यामुळे ! घाबरवून सोडणे ही ब्राह्मण्यवादाची जीवनशैली आहे ती निवडणुकीत फळणार नाही ब्राम्हण्यवाद अंतिमतः बजबजपुरी निर्माण करतो आणि त्यातून दुसऱ्या बाजीरावाचा जन्म होतो पेशवाई ह्या ब्राम्हण्यवादानेच कोसळली मराठी ब्राह्मण्यवाद्यांना त्यावेळीही हे कळलं न्हवतं आणि आत्ताही हे कळतंय असं वाटत नाही मुख्य म्हणजे शैव नाराज होत चाललेत आणि जेव्हा शैव नाराज होतात तेव्हा महाबलाढ्य औरंगजेबसुद्धा कोसळतात 

हर हर महादेव जय शिवाजी जय भवानी !

श्रीधर तिळवे नाईक 









Friday, June 9, 2023

 रुईया कॉलेजला आर्ट्सला मिळणारे ऍडमिशन अधिक पर्सेंटेजवर क्लोज होणे हे अपेक्षित होते बदललेल्या विज्ञानाची गुंतागुंत इतकी अनाकलनीय झाली कि जर खर्राखुर्रा तल्लख मेंदू नसेल तर तुम्हाला काहीही कळणे अशक्य बनते पाट्या टाकून विज्ञानांत पास होण्याचे दिवस संपलेत कारण फिल्टर लागलेत पूर्वी ते न्हवते तेव्हा कॉपी करून पास होण्याचे चान्सेस असायचे माझ्या अभिनयाच्या क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यात सर्वाधिक संख्या विज्ञान शाखेची असते त्यातील काही डफ्फर असतात आणि कॉप्या करून आम्ही कसे पास झालो ते सहज सांगतात बीएस्सी केलेल्या अनेकांना भौतिक जीव रसायनांचे मूलभूत सिद्धांतही माहित नसतात हा माझा अनुभव आहे अनेक इंजिनिअर्स तर बेकार आहेत किंवा फार पेमेंट नाही म्हणून अभिनयात हात आजमावतात काही तर डॉक्टर्स असतात पण प्रॅक्टिसचा कंटाळा असतो विज्ञान व डॉक्टरी इंजिनीयरींग  हे आता पूर्वीसारखे बक्कळ पैसे मिळवून देणारे क्षेत्र राहिलेले नाही मुळात मुलंही शार्प झालेत पूर्वी चांगले मार्क्स पडलेत टाका सायन्सला असं चालायचं आता तसं नाही मुलांना आपल्या आवडीच्या शाखेतच प्रवेश घ्यायचा असतो 

आता ह्याचा अर्थ जे आर्ट्सला गेलेत त्यांचं फार काही भलं होणार आहे का ? तर नाही ! हा एक मीडियामुळं तयार झालेला फार मोठा फुगा आहे आणि तो फ़ुटेलच एकच गोष्ट चांगली आहे ती म्हणजे कला क्षेत्रात तल्लख असणाऱ्या लोकांचे वर्चस्व वाढत जाईल 

श्रीधर तिळवे नाईक 

ek dev hjchhhdj

Profile photo for Jeevan

Jeevan

 · 

Follow

Software Engineer Updated 6y

Related

Do Tamils have a religion of their own since ancient times?

We shall see about the religious information provided as per the text from Sangam Literature. We have done this research based on final Sangam Period quantifying texts (தொகை நூல்கள்) such as நற்றிணை (Natrinai), குறுந்தொகை (Kurunthogai), ஐங்குறுநூறு (Ainkurunuru), பதிற்றுப்பத்து (Purananuru), கலித்தொகை (Kalithogai), அகநானூறு (Akananuru), புறநானுறு (Purananuru) and other texts like பத்துப்பாட்டு (Pathupattu), திருக்குறள் (Tirukkuṛaḷ), சிலப்பதிகாரம் (Silappatikaram), மணிமேகலை (Manimekalai). Most importantly we have used the text of Tholkappiam (தொல்காப்பியம்) from the mid Sangam Literature which serves as the grammar and dictionary for all the text mentioned above.


Based on these texts we can come to know about the kind of worship done and religion followed by ancient Tamil people during the Sangam time which is before 250 AD. This predates the invasion of Kalabhra dynasty (களப்பர் களப்ரர், களப்பிரர், களப்பாளர்) defeating the ancient legendary Tamil dynasties of Chera, Chola and Pandiya which ended the Sangam time. Some scholars estimate that Tholkappiam is from 8th century BC and some estimate it as 3rd century BC. So these worships and religion existed from 3rd century BC to the mid 3rd century AD. We call this timeline as ‘pure Tamil time’ or also as ‘without North Indian Ariyans mix Tamil time’. ‘North Indian Ariyans timescale’ is the time after 3rd century AD. Tholkappiam was written before the first Jains, Ariyans, Buddhists entered Tamil Nadu. Hence the Gods sited in Tholkappiam is pure Tamil Gods.


Around 6th century BC, Ariyans settled on the banks of river Ganges. Before that ancient indigenous Dravidian people were living there. However Ariyans made it their home. Tamil text call banks of river Ganges as Aariyavartham (ஆரியவர்த்தம்). Cultures of those ancient indigenous Dravidians and the newly settled Ariyans intermingled over there. In the south Jains and Buddists opposed these Vedic worshipers. Due to this opposition, circumstances did not allow Vedic Brahmins and their religion to enter the south. During that time ancient Tamil people worshiped the pure Tamil Gods. The dislike between Ariyans with the South Indian Jains and Buddhists existed for few centuries. Only during the 3rd century BC, we have some evidence that Ariyans came further South from the banks of Ganges.


Pure Tamil Gods:

Before North Indian religions of Jainism, Buddhism and Vedic Religions entered, Tamil people had their own Gods and Religion. Where Tholkappiam mentions about the internal lives (அகவாழ்க்கை) and external lives (புறவாழ்க்கை) of ancient Tamil people, it mentions about those ancient Tamil Gods.


“மாயோன் மேய காடுறை யுலகமும்

சேயோன் மேய மைவரை யுலகமும்

வேந்தன் மேய தீம்புனல் உலகமும்

வருணன் மேய பெருமணல் உலகமும்

முல்லை குறிஞ்சி மருகம் நெய்தலெனச்

சொல்லிய முறையாற் சொல்லவும் படுமே”

- அகத்திணையியல் 5


Tamil land is classified into 5 type of regions, each has their own God. Mullai (Forest), Kurungi (Mountains), Marutham (Agricultural land), Neithal (Sea Shore) and Paalai (Deserts). Tholkappiam says the Gods Mayon (மாயோன்), Seyion (சேயோன்) also called as Murugan, Vendhan, Varunan are for Mullai, Kurungi, Marutham and Neithal respectively.


As each type of land had a different God, it doesn’t mean that a particular God was worshiped in that type of land alone. The Mountain God Murugan was worshiped in (திருச்செந்தூர் அலைவாய்) Tiruchendur Alaiwai. The Forest God Mayon (also called as Thirumal) was worshiped in the mountains of Tirupati (also known as Vengadam) and in Alagar Mountain. He was also worshiped in agricultural lands of Madurai, Thiruvarangam (also known as Srirangam), Kanchipuram and in the sea shores of Kaveripoompattinam (also known as Poompuhar or Puhar).


Kottavai (கொற்றவை):

கொற்றவை = கொற்றம் (victory) + அவ்வை (Superior Woman)


Tholkappiam also mentions about the goddess of victory.


“மறங்கடைக் கூட்டிய குடிநிலை சிறந்த

கொற்றவை நிலையம் அத்திணைப் புறனே”

- தொல்காப்பியம்


Kottavai means the goddess who gives victory. During a war, Kings and soldiers worshiped Kottavai to give victory. Other normal people also have worshiped her. She was not only worshiped in Tamil Nadu, but all Dravidians. In Sanskrit she was called as Kottavaa (கொட்டவா). The sound ற்ற (also doesn’t exist in English) did not exist in Sanskrit, so they used ட்ட. Kottavai is sometimes associated with deserts. Tamil Nadu doesn't have pure desserts, but war happened in dry lands and during dry season this land looks like a desert.


Sivaperumaan (சிவபெருமான்):

The Dravidian God Sivaperumaan (also known as Siva) was also mentioned in Tholkappiam. But Sangam literature doesn’t mention the name Siva anywhere. Other names like ‘அறிவின் முனைவன்’ (மரபியல் 69), ‘கறைமிடற்றண்ணல்’ (Purananuru 55), ‘காரியுண்டி கடவுள்’ (மலைபடுகடாம் Malaipatukatam 83), ‘நீர் சடைக்கரங்தான்’ (Kurunthogai 150), ‘கணிச்சியோன்’ (Kurunthogai 2), ‘முக்கட் செல்வன்’ (Purananuru 6, Akananuru 181), ‘ஏற்றூர் தியான’ (Kurunthogai 150), ‘ஆல் அமர் செல்வன்’ (Kurunthogai 81), ‘பிறவா யாக்கைப் பெரியோன்’ (Silappatikaram 5:169), ‘நுதல் விழிநாட்டத் திரையோன்’ (Silappatikaram 14: 7), ‘தெண்ணீர் கரங்த செஞ்சடைக் கடவுள்’(Silappatikaram 20:64), ‘வளன் உயரிய எரிமருள் அவிர்சடை மாற்றருங் கனிச்சி மணிமிடற்றோன்’ (Purananuru 56: 1-2) are used to represent Siva.


The Sri Lanka text Mahavamsa (மகாவம்சம்) says that there was Lingam worship in Tamil Nadu during Sangam time. But the word Lingam is not mentioned in any ancient Tamil or Sri Lankan text.


Later the Tamil poet Manikkavacakar claims that Siva was a South India’s Dravidian by saying ‘தென்னாடுடைய சிவனே போற்றி’.


Vendhan (வேந்தன்):

The name Vendhan and Varunan looks like they are North Indian Ariyan Gods. Those two names are mentioned in Vedas. Some scholars say that they are all the same Gods. But that is not the case. The Vedic Vendhan and Varunan is different from Tamil Vendhan and Varunan.


Vendhan is the god of grasslands, plains and river beds where they do agriculture. Most people lived near the river. This is the land which has more resources in the form of water and land which is suitable for agriculture. Here people live satisfied with food and resources. As agriculture is done here, people produced and ate their own quality food. Only the excess food went for trade. They manufactured goods for exchange. People here got a lot of leisure time to think and ponder. People were rich, cultured and educated. Their wealth needed protection. This was the land of government, politics, economics and goods exchange. The mastermind behind this governance is surely the King. He gave protection for the people, their wealth, their trade and responsible for the peaceful situation to exist. For this they worshiped the King. Vendhan (also called as Mannavan or Arasan) simply means King. The life of the King is responsible for the prosperity of this land. His thoughts and actions played a vital role in the society. People who lived away from the river were not cultured when compared to the people here. So other people also had to worship the king when they visit the lowlands for trade. Tholkappiam describes this as “வேந்தன் மேய தீம்புனல் உலகம்”.


Later Vendhan was considered as a God who is worshiped by Kings. Silappatikaram translated Vendhan as Mannavan and it mentions about a Temple for Mannavan “மாலை வணகுடை மன்னவன் கோவில்” (Silappatikaram 5:73). Later in Tamil history, when Ariyans entered, Vendhan was mixed with the Ariyan God Indiran. They said both of them are the same.


Varunan (வருணன்):

People who lived near the sea worshiped Varunan. These people went into the ocean for fishing daily. The sea was dangerous and they worshiped Varunan to save them from those dangers. Tholkappiam says “வருணன் மேய பெருமணல் உலகும்”.


Ariyans did not have a god of the sea. Rig Veda describes about a different Varunan. That Varunan was a North Indian God, which got into Ariyan culture due to the intermingling of their culture with North India’s Dravidians. Rig Veda describes Varunan as a devil (அசுரன்). Ariyans also worshiped that God. That Varunan is not a sea God, but he was a God of the sky. One group of early Dravidians were the Nagar (நாகர்). Those Nagar existed all over North India, South India and Sri Lanka. They also later started to worshiped Varunan.


None of the ancient Tamil Gods had a shape or body. They worshiped only symbols. For Tamil Varunan, they used the shape of a shark's top fin to worship says Pattinappalai.


“சினைச் சுறாவின் கோடு நட்டு

மனைச் சேர்த்திய வல்லணங் கினான்”

- பட்டினப்பாலை (86-87)


Even though there are may fish in the sea, Sangam literature repeatedly says about sharks. They compare shark with the tiger. They also had classified sharks (சுறா). Some of the types of sharks mentioned are கொம்பன் சுறா, பால் சுறா, குரங்கன் சுறா, செஞ்சுறா, வாழை சுறா, பேய் சுறா, வேளா சுறா. Among that கொம்பன் சுறா and பால் சுறா had a big fin in their top, which was mentioned their symbol for worshiping.


The Pandiyan King Palyaakasaalai Muthukudumip Peruvaluthi (பல்யாகசாலை முதுகுடுமிப் பெருவழுதி) and his ancestors worshiped Varunan the sea God says Purananuru. He lived before the ancient hypothetical river Pahruli disappeared. He also celebrated a festival named Munneer festival (முந்நீர்விழாச்) for Varunan.


“எங்கோ வாழிய குடுமி! தங்கோச்

செந்நீர்ப் பசும்பொன் வயிரியர்க் கீத்த

முந்நீர் விழவின் நெடியோன்

நந்நீர்ப் பஃறுளி மணலினும் பலவே”

- புறநானுறு (9:8-11)


Above: Translated from the book பழந்தமிழும் பல்வகை சமயமும் by Mayilai Seeni Venkatasami (மயிலை சீனி வேங்கடசாமி)


Ancient Tamil God does not represent any people. They did not have any shape.


I presume that worship may have been very similar to this: New photo by Jeevan Rex


Each of these gods later got intermixed with other gods. Murugan got mixed with North Indian god Kartikeya. Tamil God Murugan did not had any shape. The beauty of mountains was called Murugan. But now the story is mixed.


Mayon became Thirumal and incarnated into the story of Vishnu and became Perumal.


Varunan was replaced by Buddhist goddess Manimekhala all around Tamil Nadu and Sri Lanka. Later Tamil Manimekhala got incarnated into Perumal.


Kottavai got incarnated as goddess Kali


Tamil almighty God Siva got incarnated into the stories of North Indian Uruthiran.


Venthan became Manavan and later incarnated into Indiran.


Many Jain and Buddhist gods also get mixed with current gods worshiped in Tamil Nadu.


So those ancient gods are still is worshiped in different forms.


Thursday, June 27, 2019

मराठा आरक्षण श्रीधर तिळवे नाईक shridhar 

मराठा आरक्षणाचा मुद्दा तात्पुरता संपला सामाजिक मागासलेपणाकडून आरक्षण आर्थिक मागासलेपणाकडे सरकलं खरतर आर्थिक मागासलेपणा ध्यानात ठेऊनच कुणबी मराठ्यांना ओबीसिंच्यात आरक्षण देण्यात आले होते पण सामाजिक उतरंडीकरणात अडकलेल्या कुणबी मराठ्यांपैकी अनेकांनी स्वतःची ओळख शहाण्णव कुळी अशी कास्ट सर्टिफिकेटवर प्रमोट केली आणि एक भलताच पेच निर्माण झाला शासक समुदायातील मराठ्यांचे वर्चस्व जसे जसे सम्पत गेले तशी तशी अस्वस्थता वाढत गेली पूर्वी शासन समुदायात प्रतिभावंत कुणबी मराठ्यांना हमखास जागा मिळे पण हळूहळू ओबीसींनी बीसींनी शासक समुदाय व्याप्त करायला सुरवात केली आणि ५० ते ६० टक्के अधिकारी ह्या समाजातून शिकून पुढे येऊ लागले आणि उच्च मराठांची मक्तेदारी त्यांनी मोडीत काढायला सुरवात केली स्वतःची आयडेंटिटी उच्च मराठा ठेवणाऱ्या अनेक कुणबी मराठ्यांना त्यांच्याजवळ मोठ्या जमिनी आणि उद्योगधंदे नसल्याने काय करायचं ते सुचेनासं झालं आणि आरक्षण हा शॉर्टकट खुणावू लागला मूळ शहाण्णव कुळी राजकारणी लोकांना ह्यात आपले हरवलेले राजकीय भविष्य पुन्हा प्राप्त करण्याची संधी दिसली त्यांना ही संधी मिळू नये म्हणून भाजपनेही हे आरक्षण देण्यासाठी काय करता येईल ते पाहायला सुरवात केली आणि आता आरक्षण मंजूर झाले ह्याचा अर्थ स्पष्ट आहे

१ कुणबी मराठा अशी ज्यांची नोंद आहे त्यांना ओबीसी कोट्यातून आधीच देण्यात आलेल्या जागा देण्यात येतील
२ ज्यांनी अशी नोंद केलेली नाही त्यांना नव्या कोट्यातून  आरक्षित जागा मिळतील प्रश्न इतकाच ह्या जागा खरोखर पूर्वाश्रमीचा कुणबी मराठ्यांना मिळणार का माझ्या मते त्या त्यांना मिळाव्यात अशी इच्छा असेल तर आर्थिक निकषही ह्या जागांना लावण्यावाचून पर्याय नाही असे निकष शासन लावणार आहे कि नाही हे अद्याप स्पष्ट नाही

मूळ प्रश्न शेतीचा होता आपल्या राजकारणी लोकांनी तो आरक्षणाचा करण्यात अभूतपूर्व यश मिळवले आहे

श्रीधर तिळवे नाईक 

Monday, June 19, 2017

माझा धाकटा भाऊ भारत तिळवे गेला. एक अनाकलनीय वादळ संपले . ज्याने एकेकाळी हवे तसे वारे फिरवले तो श्वासाला महाग होत गेला . श्रद्धांजली नाहीच कारण त्याची कशावरच श्रद्धा न्हवती . आयुष्यावरही ! जगण्यावरही !एकेकाळी दहा दहा जणांना अंगावर घ्यायला न घाबरणारा माझा हा भाऊ एका अनाकलनीय सर्वनाशात किरकोळ होत संपला . माझे त्याच्यावर आणि त्याचे माझ्यावर जबरदस्त प्रेम होते पण तरीही एका मोहोळने त्याच्या कोवळ्या वयात  आमच्या दोघांच्यात अशी काही दरी पेरली कि ती काढता काढता माझे हात गंजले पण दरी गंजून गळून गेली नाही . अस्सल कोल्हापुरी असलेला माझा हा भाऊ त्याची शान राखत जगाचा निरोप घेता तर मी त्याला आनंदाने निरोप दिला असता पण स्वतःच्या आत काय चाललंय हे कधीही कळू न देणारा हा माझा भाऊ जातानाही अधिकच अनाकलनीय होत गेला . भारत , माझ्या भावा माझा तुझ्या ताठपणाला हा शेवटचा कडक सॅल्यूट !महापुरात लव्हाळे वाचतात वृक्ष नाही हे तू पुन्हा एकदा सिद्ध केलेस .
तुझा दादा  

Saturday, April 29, 2017

माझी सख्खी बहीण उज्वला लिव्हरच्या कॅन्सरने आजारी असल्याने फोन उचलला न गेल्यास क्षमा करावी मिरज किंवा कोल्हापूर साईडला कोणी असल्यास ९९३००६२४२७ वर संपर्क साधावा